spot_img
ब्रेकिंगसरकारला 'सुप्रीम झटका'; 'त्या' प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल

सरकारला ‘सुप्रीम झटका’; ‘त्या’ प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल

spot_img

परभणी | नगर सह्याद्री:-
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

याविरोधात महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या प्रकरणाशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कोर्टात स्वत: प्रकाश आंबेडकर लढत आहेत, ते सुप्रीम कोर्टातही आज उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतच पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सूर्यवंशी यांच्या आईने पोलिसांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली.

प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची बाजू मांडली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळू लावत हायकोर्टाचा निर्णय कामय ठेवला. हा राज्य सरकारसाठी मोठा झटका मानला जातोय. त्यामुळे सोमनाथ यांचे कुटुंबीय आणि प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला मोठं यश मिळाले आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच कोम्बिंग ऑपरेशनची नोंद कोर्टाने घेतली आहे. आता एसआयटी अथवा तपास अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास करायचा, याचा निर्णय राज्य सरकार घेईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासगी बँकेचा संतापजनक प्रकार; कर्जाचे पैसे न दिल्याने एजंटने बायकॊला नेलं उचलून अन्..

News: उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील मोंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी बँकेने कर्ज वसुलीच्या...

मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

मालेगाव । नगर सहयाद्री:- मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ...

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला ओवाळणी! खात्यात थेट ३००० हजार जमा होणार?

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी...

राज्यात तुफान पाऊस बरसणार; ‘या’ ७ जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Monsoon Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी, विदर्भात...