spot_img
अहमदनगरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल, देशात मोदींची हमीच टिकणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल, देशात मोदींची हमीच टिकणार : खा. सुजय विखे पाटील

spot_img

जामखेड । नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरू असून येत्या ४ जून रोजी त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. मागील १० वर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रबावी अंमलबजावणी हे मोदी सरकाच्या विजयाचे सुत्र असून देशात मोदींची हमी टिकणार असेही त्यांनी सांगितले. ते जामखेड मधिल महायुतीच्या कॉर्नर मिटींग मध्ये बोलत होते.

अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आता कमी दिवसांचा अवधी उरला असल्याने महायुतीकडून आपल्या प्रचार सभांचा वेग वाढविला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जामखेड मधील जायभायवाडी येथे महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राम शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दशकाच्या पर्वात घेतलेले निर्णय देशासाठी महत्वाचे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकसित देशाकडे वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना नवी दिशा दिली. मोदी सरकारचे वेगळेपण म्हणजे कलम ३७०, तीन तलाख, राम मंदिर, समान नागरी कायदा हे सुत्र होय. सर्वांना सारखाच न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामुळे जनता त्यांच्यावर खुष असून त्यांना पुन्हा देशाच्या शिरस्थानी बसविणार आहे.

यामुळे आपल्या मताची किंमत ओळखून मतदारांनी देशाची सुत्रे कुणाच्या हाती द्यायचे आहेत याचा विचार करून मतदान करा असे त्यांनी यावेळी सांगितले. आ. राम शिंदे यांनी सुद्धा यावेळी मतदारांना संबोधित केले. आपले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरळ पोहचणार आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार डॉ. सुयज विखे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...