spot_img
महाराष्ट्ररडगाणे थांबवा, विकासाचे गाणे गा! "तुमची अडीच वर्षे शिव्याशाप..."; उपमुख्यमंत्री शिंदे विरोधकावर...

रडगाणे थांबवा, विकासाचे गाणे गा! “तुमची अडीच वर्षे शिव्याशाप…”; उपमुख्यमंत्री शिंदे विरोधकावर बरसले

spot_img

नागपुर । नगर सहयाद्री:-
महाविकास आघाडी गेली अडीच वर्षे रडत बसली होती. केवळ आम्हाला शिव्याशाप देण्यातच त्यांनी अडीच वर्षे वाया घालवली. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसली तरी आम्ही रडत न बसता विकासकामे करत होतो आणि यापुढेही करत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपले रडगाणे थांबवून राज्याच्या विकासाचे गाणे गा, राज्याच्या विकासात सहभागी व्हा, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत जोरदार फटकेबाजी केली. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी सभागृहात दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे विरोधकांवर अक्षरशः तुटून पडले. विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोलेबाजी केली. गेल्या अडीच वर्षांत महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांची ऐतिहासिक कामे केली आहेत. एक क्षणही न थांबता, एकही सुटी न घेता आम्ही टीमवर्क म्हणून केलेल्या कामामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने इतिहास घडवला. विकासकामांमुळे आम्ही जनतेचे लाडके सरकार ठरलो आणि त्यांनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून देत पुन्हा निवडून दिले, असे शिंदे म्हणाले.

आमच्यावर झालेल्या टीकेला आम्ही विकासकामांनी उत्तर दिले आहे. आम्ही केलेल्या कामांमुळेच महायुतीच्या सरकारने अडीच वर्षांत विकासात महाराष्ट्र मॉडेल तयार केला आणि विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. अडीच वर्षांपूर्वी राज्यात खर्‍या अर्थाने सत्तापालट झाला आणि आम्ही जनतेच्या मनातले सरकार आणले. खरेतर 2019 मध्येच जनतेच्या मनातले सरकार यायला हवे होते. पण जनतेला हवे असलेले सरकार 2022 मध्ये आणले. त्यावेळी घटनाबाह्य सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आमच्यावर टीका झाली. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्याने जनतेच्या न्यायालयात प्रचंड विजय मिळवला. किती आरोप आणि टीका झाली तरी आम्ही थांबलो नाही, असे सांगतानाच नवाबी सरकारपेक्षा आमचे गुलाबी सरकार केव्हाही चांगले आहे, असा चिमटा शिंदे यांनी काढला.

आम्ही अडीच वर्षांत अनेक योजना राबवल्या, अनेक विकासकामे केली. त्यामुळे हे गुलाबी वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. मी आणि आमचे सर्व सहकारी रडणारे नव्हे तर लढणारे आहेत, असे विरोधकांना ठणकावतानाच निवडणुकीदरम्यान टोकाची टीका करताना, एकतर तू राहशील किंवा मी राहीन…असे म्हणणारे मुख्यमंत्र्यांना येऊन पुष्पगुच्छ भेट देतात, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पात्र बहिणीचे पैसे बंद होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते दिले असून यापुढेही ते मिळत राहणार आहेत. यंदाच्या पुरवणी मागणीमध्ये 1400 कोटींची तरतूदही केली असून एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली असून 89 लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलिंडर मोफत दिले जात आहेत. ‘मुख्यमंत्री लेक लाडकी’ योजनेत 34 हजार जणांना लाभ दिला असून साडेतीन लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...