spot_img
अहमदनगरआयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगर विकास विभागाने चक्क दुर्लक्ष केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोनवेळा याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश नगर विकास विभागाला दिले होते. पण या विभागाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही व एकप्रकारे निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने आता पुन्हा तिसर्‍यांदा नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्‍यांना पत्र पाठवले असून, तातडीने आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवरील आक्षेपांची सविस्तर चौकशी करून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करावी व अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर नगर विकास विभाग आता काय कार्यवाही करते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीमुळे डांगे यांची नगर मनपात नियुक्ती झाली असून, ते मनपा कामकाजात पक्षपातीपणा करतात, असा दावा या आक्षेपात शेख यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्या नगर मनपातील नियुक्तीला 24 मे 2025 रोजी आक्षेप घेतला होता. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने 4 जून 2025 रोजी नगर विकास विभागाला पत्र पाठवून डांगेंच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी करून व नियमानुसार कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. पण त्यावर नगर विकास विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याने निवडणूक आयोगाने पुन्हा 10 ऑक्टोबरला नगर विकास विभागाला दुसरे पत्र पाठवून कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या.

मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, शेख यांनी निवडणूक आयोगाकडे पुन्हा 16 ऑक्टोबरला तक्रार केली. निवडणूक आयोगाने त्यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेतली व नगर विकास विभागाला तिसरे पत्र पाठवून तातडीने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आणि नियमानुसार आवश्यक पुढील कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्‍यांना काल सोमवारी (27 ऑक्टोबर) हे पत्र पाठवले आहे. आता या पत्रावर नगर विकास विभागाद्वारे काय कार्यवाही होते व राज्य निवडणूक आयोगाला काय अहवाल पाठवला जातो, याची उत्सुकता वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आतापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या...