spot_img
अहमदनगरबुऱ्हाणनगर योजनेचा पाणी पुरवठा सुरु करा; शिवसेनेचे संदेश कार्ले यांचे झेडपीमध्ये आंदोलन...

बुऱ्हाणनगर योजनेचा पाणी पुरवठा सुरु करा; शिवसेनेचे संदेश कार्ले यांचे झेडपीमध्ये आंदोलन…

spot_img

सुनील चोभे / नगर सह्याद्री
बुऱ्हाणनगर पाणी पूरवठा योजना सुरु असूनही सोलापूर रोडवरील दरेवाडी, वाकोडी गावांना पाणी मिळत नाही. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरला जातं आहेत.त्यासाठी पाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेचा सोलापूर रोडवरील गावांना पाणी पूरवठा तातडीने सुरु करण्यात यावा या मागणी साठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट वर ठिय्या आंदोलन केले.

– बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु असूनही १८ जून पासून नगर तालुक्यातील दरेवाडी वाकोडी या सोलापुर रोडवरील गावांना पाणी पुखठा झालेला नाही. योजना सुरु असुनही पाणी पुरवठा बंद आहे. सध्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरपूरकडे जातं आहेत.

काल दहिगाव, साकत येथे या गावात संत निवृतीनाथांची दिंडी मुक्कामास होती. सुमारे ५०ते ६० हजार वारकरी मुक्कामास होते. सध्या रोज तेवढेच वारकरी पंढरपूरकडे या रस्त्याने जातं आहेत. त्यांना देण्यासाठी लोकांकडे पाण्याचा थेंब नाही. तरी तातडीने कार्यवाही करून पाणी योजना सुरु करावी अशी मागणी कार्ले यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह माजी सभापती रामदास भोर, राजू गवळी, बाळासाहेब करांडे, भगवान करांडे, अमोल तोडमल सहभागी झाले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...