अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शहर शिवसेनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अजित गायके यांना निवेदन देवुन त्यांना घेरावा घालण्यात आला. व लवकरात लवकर या पुलाचे काम सुरु करावे. अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन केले जातील. तसेच सदर ठेकेदाराचे बील अदा करु नये, व आगाऊ बील देव नये अशी ही मागणी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली.
कल्याण रोड परिसरातील सुरु असलेल्या नवीन पुलाचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने याबाबत शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अजित गायके यांना निवेदन देवुन घेराव घालण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, परेश लोखंडे, बबलु शिंदे, संदिप दातरंगे, अशोक दहिफळे, संजय आव्हाड, अरुण झेेंडे, सुरेश क्षीरसागर, आण्णा घोलप, अंगत महानवर, प्रताप गडाख आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले की, कल्याण रोड हा मार्ग नेशनल हायवे-61 वरून जातो. त्यामुळे या भागात वाहतूक सतत सुरू असते. सध्याचा पुल निकृष्ट अवस्थेत आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस अपघाताची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे आदींनी अधिकार्यांना धारेवर धरले. काम लवकरात लवकर सुरु करावे व सध्या त्या भागात लाईटची व्यवस्था करण्यात यावी,
याबाबत महावितरणच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच परिसरात आपत्ती उद्भवल्यास कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. तसेच, पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.