spot_img
महाराष्ट्र'भिंगार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद'

‘भिंगार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद’

spot_img

भिंगारमध्ये पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून पहलगाम घटनेचा केला निषेध
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या हिंदू बंधूभगिनींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भिंगारच्या सर्व पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला भिंगार मधील सर्व बाजारपेठेमधील व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत घटनेचा निषेध केला.

यावेळी भिंगार वेशी जवळ झालेल्या आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद…, भारतमाता की जय…., जय श्रीराम अशा जोरदार घोषणा दिल्या. तसेच पाकिस्तानचा झेंडा लाखो लोकांच्या पायदळी तुडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिटकवण्यात आला. तसेच पाकिस्ताचा झेंडा जाळून निषेधही करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आर. के. दहीफळे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

भिंगार बंद आंदोलनात प्रकाश लुणिया, संभाजी भिंगारदिवे, सुनील लालबोंद्रे, महेश नामदे, संजय सपकाळ, विष्णू घुले, सचिन जाधव, नामदेव लंगोटे, रवींद्र लालबोंद्रे, संतोष बोबडे, श्याम वाघस्कर आदींसह मोठ्या संखेने सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद केले होते, पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्माच्या पर्यटकांनाच धर्म विचारून त्यांची अमानुषपणे हत्या केली.

याचा आम्ही सर्व भिंगारवासीय निषेध करीत आहोत. शहरातील पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांचीही भारतातून हकालपट्टी करावी. शहरातील ज्या ज्या ठिकाणी सरकारी सेतू कार्यालाये व पुरवठा अधिकारी अशा देशद्रोही नागरिकांना भारतीयत्वचे दाखले देत आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी मारुती मंदिर येथे सर्व भिंगारवासी सामूहिक हनुमान चालीसा पाठ करून भिंगार बंदचे आवाहन केले.

संध्याकाळी ठीक 07.30 पूर्ण भिंगार शहरातील सर्व नागरिक दोन मिनिटे आपल्या घरातील व दुकानातील लाईट बंद करून एक पणती श्रद्धांजली साठी लावून काश्मीर येथे मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यावेळी नीलेश साठे, प्रज्योत लुणिया, राजेंद्र फुलारे, बापू लिपणे, नाना मोरे, सुदाम लांडे, लॉरेन स्वामी, रुपेश भंडारी, लोक भंडारी, सोमनाथ आव्हाड आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...

पत्नीच्या डोक्यात घातला शॉकॉबसर; प्रेमविवाहाला कुणाची नजर लागली?, वाचा सविस्तर

Maharashtra Crime: विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर)...

अहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

अकोले | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले...

वीज चोरी भोवली; तिघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भिंगार हद्दीत वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय थेट वीज वापरून अनधिकृत...