spot_img
अहमदनगरभरधाव ट्रकने 'इतक्या' वाहनांना उडविले; अहमदनगर मधील दुर्घटना

भरधाव ट्रकने ‘इतक्या’ वाहनांना उडविले; अहमदनगर मधील दुर्घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना उडविले. अपघातात २० जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २९) घडली. पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १६ सीसी ४३४३) पांढरी पूल येथे समोर जात असलेल्या चार कार, एक मालवाहतूक टेम्पो व एक दुचाकीस धडक दिली.

अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र जखमींचा आरडाओरडा सुरू होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. धडक एवढ्या जोराची होती की दोन कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने फेकल्या गेल्या. अपघातात सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात काही गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना किरकोळ मार लागला आहे.

घाटातील तीव्र उतारावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक दोन किलोमीटर अंतरावरील हॉटेलवर पार्किंग करून फरार झाला. घटनास्थळी सोनई पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींवर नगर येथील खासगी तसेच काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...