spot_img
महाराष्ट्र..तर न पडणाराही पडेल! 'तो' गनिमी कावा कळूच देणार नाही; मनोज जरांगे...

..तर न पडणाराही पडेल! ‘तो’ गनिमी कावा कळूच देणार नाही; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा दिला इशारा

spot_img

Manoj Jarange Patil: ” एकजूट कायम ठेवली तर सत्ताही मिळेल आणि कधी न पडणाराही पडेल.” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी गनिमी काव्याची शक्यता नाकारण्यासाठी आड होणारी बैठक पुढे ढकलण्याची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या तारखा आल्यावर उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे ठरवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरु करुन आज एक वर्ष झालं आहे. आज त्यांनी पैठण तालुक्यातील अंबडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.जरांगे पाटील म्हणाले, सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, 24 तास वीज नाही, पाणी नाही असे म्हणत रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा आता निवडणुकीलाच आंदोलन समजा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

29 ऑगस्ट 2023 रोजी मराठा समाज एकत्र आला. या घटनेला आज वर्षपूर्ती झाली. कितीही मोठे संकट आले तरी एकत्र आलेलं कुटुंब कोणी तोडू शकत नाही आज माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे की, एखादी गोष्ट नाही मिळाली तर चार दिवस लेट मिळेल,पण विजय तुमच्या पायात येऊन पडणार आहे असे जरांगे पाटील म्हणाले.

मी जातीवादी नाही, मी आरक्षण मागत आहे. तुम्ही एकत्र आल्यामुळं मराठा समाजाला आख्ख जग पाहत आहे. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करु लागलेत. मराठा समाज एकत्रित करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वाया जाऊ देणार नाही आज छोटी बैठक आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर भूमिका जाहीर करणार असल्याचे जरांगे म्हणाले.

जरांगे पाटलांचा दानवेंवर हल्लाबोल
माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर पुरा सुफडा साफ करुन टाकेल, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्हाला होऊ देणार नाही असे म्हणतं मनोज जरांगे पाटील भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करतायेत. मी पाडा म्हंटल असत तर लोकसभेला दानवे ३ लाख मतांनी पडले असते असेही जरांगे पाटील म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती. मार्चमध्ये एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा केस केली होती. केस करून काय होईल. तुमचा पोरगा उभा राहील ना त्यावेळी कचका दाखवतो, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दानवेंना इशारा दिला आहे. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. रावसाहेब दादा तुम्ही असे वागायला नाही पाहिजे. आमच्या वाट्याला जाऊ नका, तुम्हाला जेरीस अणायला वेळ लागणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. तुमच्याकडे गुंड असतील, पण आमच्या शेतकर्‍याची पोर बुक्कीत दात पाडतील असंही जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं, त्या तावडेंनी घोटाळा केला त्यांना दिल्लीला हुसकावून लावलं. तसेच नितीन गडकरी यांनाही हुसकावून लावल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाढवली, त्यांच कुटुंब संपवलं असेही जरांगे म्हणाले. फडणवीस एकाही मंत्र्याला मोठं होऊ देत नाहीत असंही जरांगे म्हणाले. आज दीड कोटी मराठा समाज आरक्षणात गेला असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...