spot_img
अहमदनगर...म्हणुन नगरकरांनी हातात घेतली निवडणूक; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले?

…म्हणुन नगरकरांनी हातात घेतली निवडणूक; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले?

spot_img

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
नगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. मागील दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे व जनतेच्या सुखदुःखात सामील होत थेट संपर्क ठेवला असल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले असून आता माझी निवडणूक थेट जनतेनेच हाती घेतले आहे. तोफखाना बागडपट्टी सर्जेपुरा परिसरामध्ये नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी नागरिकांच्या वतीने ठिक-ठिकाणी फुलांचा वर्षाव आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत होती, जनतेचे प्रेम पाहून माझा विजय निश्चित झाला आहे त्यामुळे तिसऱ्यांदा नगरकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे, विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून केलेली विकास कामे नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यास यशस्वी झालो आहे. नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, मिसाळ गल्ली, सात भाई गल्ली, पावन गणपती मंदिर, ठाकूर गल्ली, परदेशी गल्ली, नवरंग गल्ली, शेरकर गल्ली, लोणार गल्ली परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, माजी उपमहापौर दीपक सूळ, मालन ताई ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, कालिंदी केसकर, गुलाबराव पवार, सारंग पंधाडे, सुरज जाधव, पोपट पाथरे, अजय साळवे, राजेंद्र बोगा, अभिजित चिप्पा, श्वेता पंधाडे आदीसह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...