spot_img
ब्रेकिंग...म्हणून कामगारांचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न; उबाळे, नेमकं प्रकरण काय?

…म्हणून कामगारांचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न; उबाळे, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
रेल्वे मालधक्क्या वरील कामगारांच्या नवीन त्रैवार्षिक करारावरून मोठे वादंग निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत. मंगळवारी सकाळी सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांच्या अध्यक्षतेखाली करारनाम्या साठी ठेकेदार संस्थांच्या मागणीवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला अहमदनगर माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला असून पालकमंत्री, खासदार यांचा दबावातून कामगारांचा आवाज चिरडण्यात येत आहे. वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे व शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिला आहे.

आंदोलक कामगारांना षडयंत्र करून बाजूला ठेवत सेटलमेंट करणार्‍यांना कामगार प्रशासनाने बैठकीला पाचरण केल्याचा आरोप करत कामगारांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची भेट घेत आपले गार्‍हाणे मांडले. माल धक्क्यावरील ठेकेदार संस्थांनी मंडळाकडे पुढील करारनाम्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याची तात्काळ दखल घेत कवले यांनी बैठक बोलावली.

मात्र या बैठकीला त्यांनी केवळ अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, अहमदनगर रेल्वे माथाडी कामगार युनियन आणि टोळी प्रमुखांना पाचारण केले आहे. यावर माथाडी काँग्रेस विभागाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सहायक कामगार आयुक्त मूठभर ठेकेदारांशी संगनमत करून शेकडो कामगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप माथाडी काँग्रेस विभागाने केला आहे. यावेळी कामगारांनी जिल्हा कामगार प्रशासनाच्या निषेधाचा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर केला.

किरण काळे कामगारांचे गार्‍हाणे ऐकल्यानंतर उत्तर देताना म्हणाले की, कोणत्या ही परिस्थितीत रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. अधिकारी जरी पालकमंत्री, खासदारांच्या दबावाखाली मुठभर ठेकेदारांशी संगनमत करत वागणार असतील तर त्यांना लोकशाही मार्गाने वठणीवर आणण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हितासाठी काँग्रेसची सर्व ताकद ही कामगारांच्या पाठीशी उभी केली जाईल असे काळे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...