spot_img
अहमदनगरAhmednagar Crime:..म्हणून तर माझा नवरा गेला? पत्नीने फोडला टाहो; आत्महतेपूर्वी ‘त्या‘ पाच...

Ahmednagar Crime:..म्हणून तर माझा नवरा गेला? पत्नीने फोडला टाहो; आत्महतेपूर्वी ‘त्या‘ पाच जणांच्या नावाने चिठ्ठीत काय लिहलं?

spot_img

Ahmednagar Crime: चौघांच्या नावाने एक चिठ्ठीत लिहत नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. संताराम मतकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी त्यांच्या पत्नीने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी ज्ञानेश्वर मतकर, भरत मतकर, सुनील वाणी (तिघे रा. पाचेगाव), डॉ. सुद्रिक (रा. सोनई) व देविदास काळे (रा. इमामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाची नावे आहे.

अधिक महिती अशी: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली होती.

घटनास्थळी दोन चिठ्ठ्या वेगवेगळ्या अवस्थेत मिळून आल्या होत्या. आता या प्रकरणात मोठी माहिती उजेडात आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठीत घेतलेले कर्ज फेडूनही त्रास दिला जात असल्याच्या आशयाचा मजकूर असल्याचे समजते.

पत्नीने दिलेल्या फिर्यादीत काय?
मी पाचेगाव येथील रहिवासी असून मुलगा व पती असे आम्ही एकत्रित राहावयास होतो. मोठा मुलगा व सून चार वर्षांपासून पुणे येथे कंपनीत कामाला असून ते तिथेचे राहत आहेत. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्यापूर्वी माझे पती नामे संतराम उनाजी मतकर यांनी आत्महत्या केली असून त्यावेळी त्यांनी एक चिड्डी लिहून ठेवली होती. पती संतराम उमाजी मतकर यांना व्याजाच्या पैशावरून नेहमी सनी ज्ञानेश्वर मतकर, भरत मतकर, सुनील वाणी (तिघे रा. पाचेगाव), डॉ. सुद्रिक (रा. सोनई) व देविदास काळे रा. इमामपूर हे सर्वजण त्रास द्यायचे म्हणून माझे पती यानी त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे म्हंटले आहे.

घातपात तर नाही ना?; परिसरात चर्चा
संतराम मतकर याच्या आत्महत्येबाबत चिठ्ठीत काय होते. याचा उलगडा झाला असला तरी त्याला लिहिता- वाचता येत नव्हते अशीही चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्याला विहिरीत आत्महत्या करायचीच होती तर तो गळ्याला व हाताच्या मनगटाला दोरी कशासाठी बांधेल ? यामागचे रहस्य काय? काही घातपात तर नाही ना? अशीही चर्चा परिसरात होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...