spot_img
अहमदनगर..तर ठरलं! अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार? भाजपाच्या 'बड्या' नेत्यांनी घेतली जबाबदारी, शिर्डी,...

..तर ठरलं! अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार? भाजपाच्या ‘बड्या’ नेत्यांनी घेतली जबाबदारी, शिर्डी, श्रीरामपूर, की कोपरगाव? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. 15 ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरजिल्हा मुख्यालय करावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरकर मागणीसाठी आंदोलन देखील करत आहे. दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेतली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार असल्याचे जाहीर केले.

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे होते. यावेळी सांगलीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे आणि इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, “भौगोलिक दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ही काळाची गरज आहे. श्रीरामपूरच्या बाबतीत मी नेहमी हजर राहील आणि जिल्ह्याच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करीन.” “राजकारण बदलत चालले आहे, आणि काही वेळा तडजोडी कराव्या लागतात. भारतीय जनता पक्षात कुणावरही अन्याय होणार नाही,” असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...