spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: धक्कादायक! भर रस्त्यावर युवकावर हल्ला, कारण आलं समोर..

Ahmednagar Crime: धक्कादायक! भर रस्त्यावर युवकावर हल्ला, कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
मागील भांडणाचा राग मनात धरून युवकावर कोयता व रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील सुखकर्ता कॉर्नरवर घडली. करण अशोक दाहिजे (वय २० रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गन्हादाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: करण बुधवारी दुपारी भिस्तबाग येथून ड्रायक्लीनचे कपडे घेऊन दुचाकीवरून पाईपलाईन रस्त्याने जात असताना दुपारी एकच्या सुमारास सुखकर्ता कॉर्नरजवळ त्याना तीन दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी अडवले.

करण तनपुरे याच्या हातात कोयता, सातव व अर्जुन तनपुरे यांच्या हातात लोखंडी रॉड व दोन ते तीन अनोळखी व्यक्तींकडे लाकडी दांडके होते. त्यांनी करणला मारहाण करून जखमी केले. भांडण सुरू असताना रस्त्यावरील लोक जमा झाल्याने मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले.

नेमकं कारण काय?
दोन ते तीन दिवसांपूर्वी यश सातव याने दारू पिऊन सायंकाळी साडेआठच्या सुमारास करणला शिवीगाळ केली होती. यासंदर्भात करण यांनी यशच्या आई वडिलाला सांगितले असता त्याच्यावर पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली होती. मुलाबाबत सांगितल्याचा राग मनात धरून करणला मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...