spot_img
अहमदनगरधक्कादायक! जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी पेटवला गोठा, कुठे घडला प्रकार?

धक्कादायक! जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी पेटवला गोठा, कुठे घडला प्रकार?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील निघोज येथे गोवंश तस्करीप्रकरणीत आरोपींकडून जनावरांच्या गोठ्याला आग लावून जीवित आणि आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी जैनउद्दीन उसेन मदारी (वय 32), रिहान रोशन मदारी (वय 18), मस्तान मदारी, अल्ताफ मदारी व तौसिफ मदारी (रा. निघोज, ता. पारनेर) यांनी गाडी क्रमांक एमएच एजे 9220 मधून 9 वासरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच बजरंग दल पारनेर प्रखंडाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत गाडी अडवून वासरे वाचवली.

या प्रकाराचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी निलेश भुकन (वय 36) यांच्या मालकीच्या गोठ्याला मध्यरात्री आग लावली. या आगीत दोन बैल भाजून गंभीर जखमी झाले असून, पीडिताला जर तू मधे आलास तर तुलाही जिवंत जाळू अशी धमकी देण्यात आली. ही घटना अत्यंत गंभीर असून सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणारी आहे. नागरिकांकडून आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...