अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मध्य शहरास बाजारपेठ एकाच वेळेला चोहोबाजूंनी खांदून ठेवत ऐन पावसाळ्यात व्यापारी, सर्वसामान्य नगरकरांची प्रचंड पिळवणूक मनपा प्रशासन करत आहे. विकासाच्या नावाखाली नियोजन शून्य कारभार सुरू असून आंधळ दळतंय, कुत्र पीठ खातय अशी शहराची दैनावस्था मनपा प्रशासन आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल असणाऱ्या सत्ताधारी महायुतीने केला आहे.
मध्य शहर, बाजारपेठेतील रखडलेली काम नियोजनबद्ध रित्या जलद गतीने पूर्ण करा. अन्यथा मनपाला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. कचरा संकलन यंत्रणेचा बोजवारा उडाला असून मनपाने संपूर्ण शहराचीच कचराकुंडी करत नगरचा नरक केल्याचा हल्लाबोल यावेळी चित्रा टॉकीज परिसराची पाहणी करताना काळे यांनी केला.
शहराच्या मध्यवत भागामध्ये असणाऱ्या चित्रा टॉकीज परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कचरा साचला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर या परिसराची शहरप्रमुख काळे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार आघाडीचे नेते विलास उबाळे, शहर कामगार सेना प्रमुख गौरव ढोणे, युवा सेना अहिल्यानगर विधानसभा युवा अधिकारी आनंद राठोड, सुनील भोसले, व्यापारी आघाडीचे महावीर मुथा, ओबीसी आघाडीचे गणेश आपरे, किशोर कोतकर, सामाजिक न्याय विभागाचे विकास भिंगारदिवे, बबन आढाव, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, मागासवगय विभागाचे रोहिदास भालेराव, देवराम शिंदे, दीपक काकडे, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
पावसाळ्याआधी झोपले होते काय ?
चितळे रोड ते चित्रा टॉकीज ते लक्ष्मी कारंज चौक ते पटवर्धन चौक या मार्गावर ड्रेनेज, रस्त्याची कामे सुरू आहे. या कामाची पाहणी किरण काळे यांनी केली. पाणी नंतर संताप व्यक्त करताना काळे म्हणाले, पावसाळ्यापूव मनपा प्रशासन झोपले होते काय? पावसाळ्यापूव ही कामे सुरू करून पूर्ण करण्याची गरज होती. मात्र ऐन पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर अक्षरशः एकाच वेळेला दोन्ही बाजूने खोदून ठेवून या परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांचे तसेच मोठ्या प्रमाणावर या भागातून जाणाऱ्या नगरकरांचे जगणे मुश्किल केले आहे.
… अन्यथा मनपाच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करू
चित्रा टॉकीज परिसरामध्ये रस्त्यावर साचलेला कचरा दोन दिवसांच्या आत उचलून परिसर स्वच्छ न केल्यास सदर ठिकाणी शहराची कचराकुंडी केल्या बद्दल मनपा प्रशासन, सत्ताधारी महायुतीचे आभार मानणारा जाहीर फलक लावून जाहीर निषेध करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे. त्यानंतरही आवश्यक ती कार्यवाही न केली गेल्यास नागरिकांना काय यातना होतात याची मनपाला जाणीव व्हावी याकरिता सदर दुर्गंधीयुक्त कचरा हा शिवसेना मनपा कार्यालयात घेऊन येत मनपाच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.