spot_img
महाराष्ट्रशिंदेंची टीम फायनल! कुणा कुणाला मंत्रिपद फिक्स; यादी आली…

शिंदेंची टीम फायनल! कुणा कुणाला मंत्रिपद फिक्स; यादी आली…

spot_img

Maharashtra Politics News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतंर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्र सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाची टीम फायनल होत आली आहे. मंत्रिपदासाठी शिंदेगटाकडून काही आमदारांना फोन गेले आहेत. यात कोणाचा नंबर लागला? अन् कोणाचा पत्ता कट झाला? पाहूया संभाव्य मंत्र्यांची नावं..

महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाचे वरिष्ठांचे फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आज भाजपसह शिवसेना शिंदे गटाची यादी समोर आली आहे.शिवसेनेत 5 जुने मंत्री आणि 7 नवीन आमदारांना म्हणजे एकुण 12 जणांना संधी मिळणार आहे.

या आमदारांना गेले शिंदेगटाकडून फोन
१.भरत गोगावले
२.उदय सामंत
३.प्रताप सरनाईक
४.योगेश कदम
५.आशिष जैस्वाल
६.गुलाबराव पाटील
७.शंभूराजे देसाई
८.प्रकाश आबीटकर
९. दादा भूसे

पाच जुन्या मंत्र्यांना मिळणार पुन्हा संधी
1. उदय सामंत, कोकण
2. शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5. संजय राठोड, विदर्भ

या नेत्यांचा पत्ता कट?
1. दीपक केसरकर
2. तानाजी सावंत
3. अब्दुल सत्तार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....