spot_img
महाराष्ट्र'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान'

‘शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान’

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
‘शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार’, असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘शिंदेंची गरज आता संपली आहे असेच दिसत आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि पुढे नवीन उदय येईल.’, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ‘शिंदेंना संपवणार, नवीन उदय होणार?’ असे वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? कदाचित ते बाजूला व्हावेत अशी भीती आहे. आता उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात येईल.

तसंच, ‘उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही डग्यावर हात मारून आहे. काही संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे.’, असे देखील मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका असं मी सांगितले होते, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ‘अंगावर आल्यावर सगळे आठवते. त्यावेळेस का नाही आठवलं? पुढाकार कोणी घेतला. जाऊ नका मग काय सांगताय. पुढे तुम्हीच गेले. दादांसोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता.’, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...