spot_img
अहमदनगर"शरद पवारांनी नगरची चिंता...."; मंत्री विखे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा..

“शरद पवारांनी नगरची चिंता….”; मंत्री विखे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

शरद पवार यांनी नगर जिल्ह्याची चिंता करायचे सोडून दिले पाहिजे. संस्था, बँका, कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. जिल्ह्याचे लोक समर्थ आहेत. एवढे वर्ष महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले. ते आता संपुष्टात येत आहे. याची त्यांच्या मनात खंत आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वायबी चव्हाण सभागृहात उदय गुलाबराव शेळके फौउंडेशनच्या बोधचिन्ह अनावरण व उद्घाटन पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले होते. यावेळी त्यांनी विखे पाटील व शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता टीका केली होती. त्याला शुक्रवारी नगरमध्ये पालकमंत्री विखे पाटील यांनी उत्तर दिले. विखे पाटील म्हणाले की खंडकरी शेतकर्‍यांसाठी कॉ. माधवराव गायकवाड आणि स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी लढा उभा केला. न्यायालयापर्यंत लढाई दिली. खंडकरींच्या जमिनी द्यायला सुरुवात झाली आहे. त्या जमिनी भोगवटा दोनच्या एक करताना पूर्वीच्या सरकारने करता येत नाही असे म्हटले होते.

आकारी जमिनी खंडाने दिलेल्या नाहीत, अधिगृहित केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना देण्यात अडचण आहे, असे म्हटले होते. परंतु कारखाना बंद पडल्याने आहे त्या स्थितीत शेतकर्‍यांना जमिनी देण्याची गरज होती. मागच्या महसूल मंत्र्यांनी अ‍ॅडव्हकेट जनरल कुंभकोणी यांना आपल्याला जमिनी शेतकर्‍यांना परत करायच्या नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही शेतकर्‍यांना विरोध केला असे सांगितले होते. पूर्वीचे महसूल मंत्री हे शेतकरी विरोधी होते, अशी टिका त्यांनी केली. कोणते महसूल मंत्री अशी विचारणा केल्यावरते तुम्हा शोधा असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...