spot_img
ब्रेकिंगशरद पवारांनी जनाधार गमावला, आता त्यानी घरी बसावे; विखे पाटलांची टीका

शरद पवारांनी जनाधार गमावला, आता त्यानी घरी बसावे; विखे पाटलांची टीका

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:
जाणते राजे असणाऱ्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

गुरुवारी लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रो उत्सवानिमीत्त नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री विखे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. तर सत्ताधारी महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी कुणीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नाही.

ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती. तसेच निवडणूक नाकारण्याचीही गरज होती. जनमत बाजूने असले की ईव्हीएम चांगली, पण विरोधात गेले की वाईट अशी विरोधकांची गत झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ते पळवाटा शोधत आहेत. शरद पवार जाणते राजे आहेत. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी घरी बसावे. त्यांनी आतापर्यंत जनता व राज्याचे खूप वाटोळे केले. यापुढे त्यांनी ते करू नये असे ते म्हणाले.

विखे पाटलांनी यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा फेटाळून लावत मंत्रीपदाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असतील असेही ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे नाराज असल्याचे रान माध्यमांनी उठवले आहे. पण ते नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी स्वतः भाजपचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले आहे. आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांना आहे.

विशेषतः संभाव्य मंत्रिपदांबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळे काही मागण्याची काहीच गरज नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आगहे. त्यानुसार ते मला चांगलीच जबाबदारी देतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...