spot_img
महाराष्ट्रशरद पवार गटाच्या 'या' पाच जागेंवर 'हे' उमेदवार ठरले ! प्रकाश आंबेडकर,...

शरद पवार गटाच्या ‘या’ पाच जागेंवर ‘हे’ उमेदवार ठरले ! प्रकाश आंबेडकर, संभाजी राजांना सोबत घेण्याचे सूतोवाच…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटासाठी पाच जागा जवळपास निश्चित झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बारामती, सातारा, रावेर, शिरुर, नगर दक्षिण या जागावर पवार गट लढवण्याची शक्यता आहे.

या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, रावेरमधून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, सातारामधून श्रीनिवास किंवा बाळासाहेब पाटील, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर आली आहेत.

शरद पवार म्हणाले, जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न राहीलं. राज्यात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांना घेवून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. एक दोन जागांचा तिढा आहे, त्या पार्श्वभूमीनर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे यांच्या पक्षाला काही जागा सोडण्यासांदर्भात विचार सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...