spot_img
अहमदनगरकोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या जामीनास फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून मेडीकल पॅरीटीवर दिलेल्या जामीन बाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पीटिशन करून आव्हान दिले आहे. मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शंकर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राऊत म्हणाले, जिल्हा बंदी उठलेले सचिन कोतकर नगर जिल्ह्यात आल्यावर त्याने एका हॉटेल कमगारास मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामधील कलम ३५१ (३) मध्ये ७ वर्ष शिक्षेची तरतुद आहे. मात्र ३ महिन्यात अजून कोणताही तपास झाला नाही. या प्रकाराबाबत सचिन कोतकरचा जामीन रद्द करावा. कोतकरने पुन्हा गुन्हेगारी करण्यासाठी डोके वर काढलेे आहे. नगर जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करावी अशा प्रकारची जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे तात्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान, २०१९ मध्ये मूळ शिक्षेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. संदीप, सचिन, अमोल कोतकरला मेडीकल पॅरीटीवर मिळालेल्या जामीनास राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.या प्रकरणात अ‍ॅड. जितेंद्र गायकवाड आणि अ‍ॅड. पाटील हे कामकाज पाहत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...