spot_img
महाराष्ट्रनिघोज परिसरात तीव्र पाणी टंचाई? नाराज जनतेने केली 'अशी' मागणी

निघोज परिसरात तीव्र पाणी टंचाई? नाराज जनतेने केली ‘अशी’ मागणी

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
निघोज परिसरात गेली आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून कुकडी नदीला पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे.गेली तीन आठवड्यापासून कुकडी डावा कालव्याला आवर्तन सोडले आहे. मात्र निघोज परिसरात पाणी सुटले नाही याचे कारण स्पष्ट होत नाही.

बैलगाडा शर्यतीमुळे पाणी उशीरा सोडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दि. १ एप्रिल व दोन एप्रिल असे दोन दिवस बैलगाडा शर्यत सुरू असून पाच लाख रुपये पेक्षा जास्त बक्षीसे विजेत्यांना देणार येणार आहेत. या बैलगाडा शर्यती पुष्पावती नदीकाठी असल्याने या नदीला पाणी सोडल्यास बैलगाडा शर्यतीला अडथळा येऊ शकतो म्हणून पाणी उशीरा सोडण्यात येणार असल्याचे प्रमुख कारण आहे.

मात्र गावांमध्ये पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायत दिवसाआड पाणीपुरवठा करीत होती मात्र गेली चार दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात राहात आहे. आणी यातील बहुतांश लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्यामुळे कुकडी नदीला तातडीने पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना गुड न्यूज! जूनचा हप्ता जमा होणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

मुंबई। नगर सहयाद्री:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या...

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र; राज्याचे लक्ष ‘विजयी मेळावा’ कडे

मुंबई । नगर सहयाद्री :- राज्यात त्रिभाषा सूत्राविरोधात निर्माण झालेल्या वातावरणानंतर आज मुंबईत वरळी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या ग्रहांनी दिशा बदलली, कुणाच्या कुंडलीत काय? पहा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा...

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...