spot_img
महाराष्ट्रनिघोज परिसरात तीव्र पाणी टंचाई? नाराज जनतेने केली 'अशी' मागणी

निघोज परिसरात तीव्र पाणी टंचाई? नाराज जनतेने केली ‘अशी’ मागणी

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
निघोज परिसरात गेली आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून कुकडी नदीला पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे.गेली तीन आठवड्यापासून कुकडी डावा कालव्याला आवर्तन सोडले आहे. मात्र निघोज परिसरात पाणी सुटले नाही याचे कारण स्पष्ट होत नाही.

बैलगाडा शर्यतीमुळे पाणी उशीरा सोडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दि. १ एप्रिल व दोन एप्रिल असे दोन दिवस बैलगाडा शर्यत सुरू असून पाच लाख रुपये पेक्षा जास्त बक्षीसे विजेत्यांना देणार येणार आहेत. या बैलगाडा शर्यती पुष्पावती नदीकाठी असल्याने या नदीला पाणी सोडल्यास बैलगाडा शर्यतीला अडथळा येऊ शकतो म्हणून पाणी उशीरा सोडण्यात येणार असल्याचे प्रमुख कारण आहे.

मात्र गावांमध्ये पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायत दिवसाआड पाणीपुरवठा करीत होती मात्र गेली चार दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात राहात आहे. आणी यातील बहुतांश लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्यामुळे कुकडी नदीला तातडीने पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महायुतीत खटकाखटकी! NCP कडून शिंदेसेनेचा टप्प्यात कार्यक्रम! उमेदवारच अजित पवारांच्या पक्षात गेला अन्…

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास आजपासून...

सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय ; माजी आमदारपुत्राचं अजित पवारांना खुले आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं

सोलापूर / नगर सह्याद्री - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक...

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...