spot_img
अहमदनगरनारायणगव्हाणला अपघातांची मालिका सुरूच; ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

नारायणगव्हाणला अपघातांची मालिका सुरूच; ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

spot_img

सुपा | नगर सह्याद्री – 
नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण येथे अपघातांची मालिका सुरू असून नारायणगव्हाण ग्रामस्थ जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांचा रस्त्यावरचा प्रवास धोकादायक झाला आहे. वेळोवेळी निवेदने, आंदोलने करूनही अधिकारी खुर्चीवरून हालायला तयार नसल्यामुळे रस्त्याची लढाई रस्त्यावर लढण्यासाठी नारायणगव्हाणकरांनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.

यावेळी सुपा पोलिस स्टेशनचे नव्याने रूजु झालेले पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी मध्यस्थी केली. संतप्त ग्रामस्थ रस्त्यावरून हटायला तयार नव्हते; परंतु पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा करून मार्ग काढू, मी तुमच्या पाठीशी उभा राहील अशी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावरून बाजुला होत येत ग्रामपंचायत कार्यालयलात बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय भावसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, मंडल अधिकारी बी. जी. पवार, तलाठी शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी गायकवाड उपस्थित होते. पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी आंदोलनकर्ते सचिन शेळके, सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सरपंच मनिषा जाधव, माजी सरपंच विलास खोले, चेअरमन दादासाहेब शेळके, लक्ष्मण शेळके, अर्जून वाल्हेकर, शिवाजी नवले, हुसेन शेख, किसन शेळके, विजय चव्हाण, बाळकृष्ण शेळके, मिलिंद शेळके आदींसोबत चर्चा केली.

भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी हजर नसल्याने रस्त्याच्या मोजणीचा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी उपविभागीय अभियंता यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणी शुल्क भरल्याचे सांगितले. तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी नकाशा आवश्यक असून पक्का नकाशा मिळत नसल्यामुळे मोजणीची समस्या येत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी समजुतीचा नकाशा बनवून दिला. मंडल अधिकारी, महसुल प्रतिनिधी बी. जी. पवार, तलाठी शिरसाठ यांना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी धारेवर धरत तहसीलदारांनी भूमी अभिलेख अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे पत्र का दिले नाही, असा सवाल केला. यावेळी तलाठी शिरसाठ यांनी तहसीलदारांना फोन करत १६ तारखेला संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची पारनेर येथे अंदोलनकर्ते ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्याचे आश्वस्त केले. नारायणगव्हाण येथील चौपदरीकरणाचा तिढा पारनेर तहसील कार्यालयात न सुटल्यास अमरण उपोषण करू, असा इशारा सचिन शेळके यांनी दिला. पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी दगडू हारदे, शिवाजी शेळके, काशिनाथ कांडेकर, धोंडींबा गायकवाड, भीमा जाधव, आप्पा शेळके, भीमबाई कांडेकर, बाळासाहेब काकडे, भाऊसाहेब नाईक, दादा ठुबे, लहानू शेळके, सुनील शेळके, विकास पवार, बबन नवले, नितिन जाधव, अनिल शेळके आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...