spot_img
महाराष्ट्रखळबळजनक! शिर्डीतील साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

खळबळजनक! शिर्डीतील साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री:-
पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान साईंची शिर्डी आहे. या शिर्डी संस्थानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून सध्या तिथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला ही धमकी पाठवली.

या प्रकारामुळे साई संस्थान आणि स्थानिक पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु आहे. पोलिस विभागाकडून ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू असून, ही धमकी केवळ खोडसाळपणातून देण्यात आली आहे की त्यामागे कुठली तरी गंभीर योजना आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थानने या घटनेबाबत तपशील देण्यास नकार दिला आहे. तरीही, या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी कडक करण्यात येत असून, सीसीटीव्ही आणि कुतूहलजनक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. हे पहिल्यांदाच नाही, यापूर्वीही साई संस्थानला अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते.

मात्र त्यातील बहुतांश धमक्या बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तरीही, पहलगाम हल्ल्यानंतर आलेली ही नवीन धमकी अधिक गंभीर मानली जात आहे. सध्या शिर्डीमध्ये भाविकांची वर्दळ असून, पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पणे । नगर सहयाद्री:- कायद्याचे रक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस खात्याची काही भक्षक बनलेल्या पोलिसांमुळे...

६०० रुपयात मिळणार एक ब्रास वाळू; ‘असा’ करा अर्ज..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध...

पाकिस्तानला मोठा धक्का!; भारताचा महत्वपूर्ण निर्णय

India vs Pakistan: भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच...

गाव हादरवणारी घटना! आईसह ३ मुलींची सामूहिक आत्महत्या, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री: - काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. आईने पोटच्या तीन मुलीसह...