spot_img
राजकारणबच्चू कडू-शरद पवारांत गुप्त चर्चा, जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत..नेमकं काय...

बच्चू कडू-शरद पवारांत गुप्त चर्चा, जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत..नेमकं काय म्हणाले बच्चू कडू..पहा..

spot_img

अमरावती / नगर सह्यादी : महाराष्ट्रातील राजकारण आता आगामी लोकसभा व विधानसभेच्या अनुशंघाने वेगाने फिरू लागलं आहे. महाविकास आघाडी असताना मंत्री असणारे व नंतर शिंदे गटासोबत भाजपसोबत गेलेले बच्चू कडू हे नेहमीच त्यांच्या शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांनी मध्यंतरी महायुती सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरून घरचा आहेर दिला होता.

आता आज कडू यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार अमरावती दौऱ्यावर असून बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. कडू यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबदल बघू, असे महायुतीत राहण्याबद्दलचे सूतोवाच कडू यांनी केले आहे.

मदतीची जाणीव म्हणून शरद पवारांना आम्ही फोन केला आणि घरी येण्याच निमंत्रण दिले होते. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करू, असे कडू म्हणाले.

बच्चू कडू यांच्या घरी दोघांत चर्चा
शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली. शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचे ते म्हणाले. जास्त शेतीवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तसेच बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते, असे कडू म्हणाले. तसेच पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे हे रोजगार हमी योजनेत व्हावीत, हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे हे मी सांगितल्याचे कडू म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...