spot_img
अहमदनगरAhmednagar: मनपा सेवेत घोटाळा? कायम करण्यासाठी बाहेरची नावे.. नेमकं प्रकरण काय?

Ahmednagar: मनपा सेवेत घोटाळा? कायम करण्यासाठी बाहेरची नावे.. नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिकेत अभियंता, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वीजतंत्री, वायरमन, लॅब टेनिशियन अशा पदांवर गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या २२ कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला होता. सर्वसाधारण सभेच्या ठरावात २८ जणांची नावे मंजूर केली आहेत.

वाढीव सहा नावांमध्ये पाच नावांवर आक्षेप असून यात मनपात सध्या मानधनावर कार्यरत नसलेल्या कर्मचार्‍याचे नावही घुसवण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी थांबवली आहे.

अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचा विषय १५ सप्टेंबरच्या सभेसमोर होता. यात प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी १, परिचारिका ४, लॅब टेनिशियन १, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) ३, कनिष्ठ अभियंता (टो मोबाइल) १, विजतंत्री २, वायरमन १० अशा २२ कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली होती.

त्याची यादीही सोबत जोडली होती. सभेत यावर कोणतीही चर्चा न होता विषय मंजूर करण्यात आला. मात्र, प्रशासनाकडे ठराव पाठवल्यावर त्यात २८ नावे असल्याचे समोर आले.आस्थापना विभागाने प्रस्ताव व ठरावाची माहिती प्रशासक जावळे यांच्याकडे निर्णयासाठी सादर केली आहे. मात्र, वाढीव नावांमुळे प्रशासकांनी हा प्रस्ताव थांबवला आहे.

२८ पैकी काही कर्मचारी वयोमर्यादेत बसत नाहीत. तसेच, यापूर्वी मानधनावर कार्यरत असलेला मात्र, सध्या कार्यरत नसलेल्या एका कर्मचार्‍याचे नावही या यादीत असल्याचे समजते. प्रशासनाने प्रस्ताव करताना किमान पाच वर्षांपेक्षा अधिक काळ मानधनावर मनपात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता प्रशासक या प्रस्तावावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...

शहरात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा; संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । नगर सहयाद्री:- संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र...

अर्ध्या तासात नवरी झाली विधवा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?

अमरावती । नगर सहयाद्री:- अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच...