spot_img
अहमदनगरसाखरेच्या गोडव्याला कडवे बोल! उत्तरेला दिवाळी आणि दक्षिणेला शिमगा?

साखरेच्या गोडव्याला कडवे बोल! उत्तरेला दिवाळी आणि दक्षिणेला शिमगा?

spot_img

विक्रम राठोड यांचा खासदार विखे यांच्यावर निशाणा!

अहमदनगर | नगर सह्याद्री

शिर्डी मतदार संघातील सहा हजार कटुबांना साखर वितरण करत मतदार संघातील मतदारांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय विखे पाटील कटूंबानी घेतला आहे. उत्तरेत सुरू असलेल्या साखर वाटपावरून दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी निशाणा साधला आहे.

विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदार संघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावली निमित्त ५ किलो मोफत साखर भेट देण्याच्या योजनेचा शुभारंभ खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. दक्षिणेतुन निवडून येऊन उत्तरेत साखर वाटण्यावरून शिवसेनेने खासदार विखे यांना निशाण्यावर घेतले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, खासदार सुजय विखे यांनी दक्षिणेतुन विजय मिळवल्यानंतर प्रत्येक दिवाळी उत्तरेतील जनतेबरोबर साजरी करताना दिसत आहे. खासदार सुजय विखे हे नगर उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदार संघात साखर वाटीत फिरत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी नगर दक्षिणेत साखर वाटणे अपेक्षित होते.

उत्तरेकडील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे प्रश्न सोडवता. मग नगर दक्षिण विषयी सापत्न भाव का ठेवता?आपण नगर दक्षिण लोकसभा मतदार संघावर अन्यायच करतात. नगरचा निधी शिर्डीला वळवला. आता दिवाळीचा साखरेचा गोडवा देखील तिकडेच वाटत आहात.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व शासन आपल्या दारी, कार्यक्रम देखील शिर्डीलाच. कर्जत जामखेडला एमआयडीसीला विरोध करत उत्तरेला एमआयडीसी दिली. उत्तरेला दिवाळी आणि दक्षिणेला काय शिमगा का? असा सवाल राठोड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....