spot_img
ब्रेकिंगसरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह 'या' कामांसाठी करणार उपोषण..

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाजदिपूर हे आदिवासीबहुल गाव असून, येथील सुमारे १२०० लोकसंख्या भिल्ल आणि धनगर समाजाची आहे. हे गाव स्वातंत्र्यापासून रस्त्यापासून वंचित आहे.

वडगाव सावताळपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला जोडणारा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वडगाव सावताळ ग्रामपंचायत हद्दीतील या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच संजय रोकडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास ०९ ऑगस्ट २०२५ पासून वडगाव सावताळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांचा रस्त्याअभावी शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी होणारा त्रास असह्य झाला आहे. रस्ता झाल्यास गाजदिपूरच्या विकासाला चालना मिळेल, असे सरपंच रोकडे यांनी सांगितले. याबाबत प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

वंदे भारत एक्सप्रेस आता अहिल्यानगरच्या स्थानकावर!

खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि विशेषतः अहिल्यानगर लोकसभा...