spot_img
ब्रेकिंगतुझा संतोष देशमुख करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, तरुणाने सांगितली आपबिती

तुझा संतोष देशमुख करू…! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, तरुणाने सांगितली आपबिती

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
बीडमधील परळीत काल (१६ मे) शिवराज दिवटे या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या, काठ्या आणि हत्यारांनी तरुणाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून जखमी शिवराजवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवराज दिवटेने त्याच्यासोबत काय घडले याची माहिती दिली. ‘मी माझ्या मित्रांसह अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होता. त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते. मला त्या संदर्भात काहीच माहिती नव्हती. त्यानंतर मी माझ्या गावी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवले आणि दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले’, असे शिवराज म्हणाला.

‘रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेल्यानंतर त्यांनी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करु असे म्हणत होते. काही लोक माझ्या मदतीला आले. त्यांच्या तावडीतून मला सोडवले नसते, तर त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी’, असे म्हणत शिवराज दिवटेने घडलेला प्रसंग सांगितला.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. हे लोक वाल्मीक कराडच्या गँगशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केले आहे. शिवराज दिवटेच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...