spot_img
अहमदनगरमहापालिकेवर भगवा फडकविणार; नगरमध्ये ठाकरे, शिंदे सेनेचे पदाधिकारी काय म्हणाले पहा...

महापालिकेवर भगवा फडकविणार; नगरमध्ये ठाकरे, शिंदे सेनेचे पदाधिकारी काय म्हणाले पहा…

spot_img

शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा | श्री विशाल गणपती मंदिरात आरती; नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरात शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिवस गुरुवारी (दि.१९ जून) उत्साहात साजरा करण्यात आला. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आरती करुन माळीवाडा वेस येथे नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप करण्यात आले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करुन महापालिकेवर भगवा फडकविण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, दिलीप सातपुते, माजी महापौर सुरेखा कदम, रोहिणी शेंडगे, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, संजय शेंडगे, माजी नगरसेवक आप्पा नळकांडे, दत्ता कावरे, अनिल लोखंडे, दत्ता जाधव, संतोष ग्यानप्पा, दीपक खैरे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, महेश लोंढे, सुनील लालबोंद्रे, रवींद्र लालबोंद्रे, ओमकार शिंदे, पारुनाथ ढोकळे, अजित दळवी, अभिषेक भोसले, अशोक दहिफळे, विशाल शितोळे, दशरथ शिंदे, सचिन लोखंडे, विनोद गायकवाड, संग्राम कोतकर, अक्षय भिंगारे, सुनील भिंगारदिवे, अभिजीत तांबडे, घनश्याम घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या विचाराने हिंदुत्वाचा वारसा घेऊन वारसा घेऊन शिवसेना पुढे जात आहे. सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या हातात सत्ता देण्याचे काम शिवसेनेने केले. आजही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.अनिल शिंदे यांनी हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन एकनाथ शिंदे स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा चालवत आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामातून शिवसेनेची खरी ओळख जनतेला पटली आणि जनतेचे त्यांचे नेतृत्व मान्य करुन विधानसभेत मोठ्या संख्येने शिवसेनेचे उमेदवार निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.संभाजी कदम म्हणाले की, देशाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे शिवसेनेचे कार्य आहे. शिवसेनेच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांमधील स्वाभिमान जागा करुन त्यांना उभे करण्याचे काम केले. आजही तो वारसा व विचाराने शिवसेना कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहर वाचवायचे असेल तर मनपा निवडणुकीत महायुतीचा पराभव करावा लागेल ः किरण काळे
गेली सहा दशक महाराष्ट्रात आणि चार दशकं अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेचा झंझावात सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी घोंगावतो आहे. शहरातील सर्व घटकांच्या हिताच्या संरक्षणा करिता आणि विकासा करिता शिवसेनेने, शिवसैनिकांनी, लोकांच्या भरघोस पाठिंबावर तीव्र लढा उभारला. शिवसेनेचा समाजसेवेचा विचार आजही आढळपणे काम करतो आहे. शहराची नियोजन शून्य वाटचाल, त्यातून झालेली वाताहात, मनपाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, याला लगाम घालत शहर वाचवायच असेल तर आगामी मनपा निवडणुकीत महायुतीचा पराभव नगरकरांच्या पाठिंब्याने ठाकरे शिवसेनेला करावाच लागेल, असे प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.

पक्षाच्या स्थापनेला आज ५९ वर्षे पूर्ण झाली. वर्धापन दिना निमित्त ठाकरे शहर शिवसेनेच्या वतीने अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग, अंध बांधवांना फळ, खाऊ वाटप करून स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार आघाडीचे नेते विलास उबाळे, शहर कामगार सेना प्रमुख गौरव ढोणे, युवा सेना अहिल्यानगर विधानसभा युवा अधिकारी आनंद राठोड, सुनील भोसले, व्यापारी आघाडीचे महावीर मुथा, ओबीसी आघाडीचे गणेश आपरे, किशोर कोतकर, सामाजिक न्याय विभागाचे विकास भिंगारदिवे, बबन आढाव, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, मागासवर्गीय विभागाचे रोहिदास भालेराव, देवराम शिंदे, दीपक काकडे, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.काळे पुढे म्हणाले,अहिल्यानगर शहरात देखील शिवसेना कायम संघर्षाच्याच भूमिकेत राहिली. हा संघर्ष सर्वसामान्य माणसासाठी, या शहराला दहशतमुक्त करण्यासाठी, शहराच्या प्रगतीसाठी, गोरगरीब, दीन दुबळ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, व्यापारी, उद्योजकांना पाठबळ देण्यासाठीचा संघर्ष शिवसेनेने या शहरात स्व. अनिलभैय्या यांच्या नेतृत्वाखाली केला. स्व. राठोड यांची उणीव आज ही निश्चितच आहे. ती केवळ शिवसैनिकांनाच नव्हे तर तमाम नगरकरांच्या मनामध्ये आहे.

नियोजनशून्य कारभार
सरकार निवडणुकांना घाबरतय. म्हणून निवडणुका त्यांनी अनेक वर्ष टाळल्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे त्या होऊ घातल्यात. मात्र प्रशासक राजच्या माध्यमातून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीतील घटक पक्षांनी संपूर्ण शहराचे तीन तेरा, नऊ बरा वाजवले आहेत. शहरातील विकास कामांचे कोणतेही नियोजन नाही. ऐन पावसाळ्यात संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे. या शहरातील व्यापारी, उद्योजक, चाकरमानी, हातावर पोट भरणारा, प्रत्येक घटक यामुळे बेजार झाला आहे. नियोजन शून्य कारभार करणार्‍या आणि भ्रष्टाचार करून शहराची लाईफ लाईन असणार्‍या महानगरपालिकेला महायुतीने गिळंकृत केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकर्‍यांना दिलासा : फळपिक विमा भरण्यासाठी मुदत वाढविली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून विमा...

वर्धापनाच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा जय महाराष्ट्र…

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे मुंबईसह राज्यात राजकीय घडामोडींना...

लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय; आता पतसंस्था स्थापन करून..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय...

बहिणीसोबत अश्लील चॅटिंग; मित्राने केला मित्राचा दगडाने ठेचून खून

पुणे / नगर सह्याद्री : मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील चॅटिंग करणाऱ्या तरूणाचा दगडाने...