spot_img
अहमदनगरAhmednagar: पळापळ!! १०५ जणांवर ठपका, कारवाई होणार? अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट

Ahmednagar: पळापळ!! १०५ जणांवर ठपका, कारवाई होणार? अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर अर्बन सहकारी बँकेतील (बहुराज्यीय) कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (७२, रा. टाकळी ढोकेश्वर, पारनेर) यांना सोमवारी पहाटे आळेफाटा (पुणे) येथून अटक केली होती. त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने व्यापारी व बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी चेअरमनच अटक झाल्याने घोटाळा काळातील सर्वच संचालकांची पाचावर धारण बसली असून, त्यांची पळापळ सुरू झाली आहे.

अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. सुरुवातीला बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २८ कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सुमारे १५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते; परंतु पोलिसांनी कर्ज प्रकरणांचे ’फॉरेन्सिक ऑडिट’ केल्यानंतर ही रक्कम २९१ कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

या अहवालात १०५ जणांच्या व्यवहारावर ठपका ठेवल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शयता आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन माजी संचालक, दोन शाखाधिकार्‍यांसह कर्जदारांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. बँकेवर केंद्रीय सहकार मंत्रालयाने अवसायकाची नियुक्ती केली असून ठेवीदारांचे सुमारे ३०० कोटींहून अधिक रक्कम अद्याप अडकली आहे. हे पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदार वेळोवेळी आंदोलन करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....