spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News: सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधुन कंपनीत टाकला दरोडा! पण एक...

Ahmednagar Crime News: सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधुन कंपनीत टाकला दरोडा! पण एक चूक नडली, कारागृहाची हवा घडली..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विंड वर्ड इंडिया लिमिटेड कंपनीतील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधुन कंपनीत दरोडा टाकणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. प्रशांत बाळू चांदणे, मोबिन मेहबुब अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

खांडके शिवारातील विंड वर्ड इंडीया कंपनीत दिनांक ६ जून रोजी सुरक्षा रक्षक चंद्रकांत ठोंबरे यांचे हातपाय बांधून ठैवले होते. आरोपींनी त्याच्या ताब्यातील टेम्पो व मोटार सायकल घेऊन प्रकल्पात गेले होते. ठोंबरे यांनी स्वतांची सुटका करून घेतली. त्यानंतर प्रकल्प सुपरवायजर यानीं सूरक्षा संभाजी पालवे यांना बोलवून घेतले होते. ग्रामस्थांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते टेम्पो, दुचाकी सोडून पळून गेले होते. या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने केला.

यासंदर्भात पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती समजली की, घटनास्थळी सापडलेली मोटार सायकल ही प्रशांत बाळू चांदणे यांच्या मालकीची असल्याचे माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावत आरोपीला ताब्यात घेतले. त्यांनी साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. पोलिसांनी मोबिन मेहबुब अन्सारी याला ताब्यात घेतले. तर सुरजीत गुंजाळ (रा.माथनी), महेश पवार(रा.निबोडी), सागर कुकरेजा(रा.नगर) आदी पसार असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...