spot_img
ब्रेकिंगमहसूल मंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर! दिले 'हे' महत्वाचे आदेश

महसूल मंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर! दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

spot_img

निघोज। नगर सहयाद्री-

राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या असून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

पारनेर तालुक्यातील निघोज, गांजीभोयरे, सांगवीसुर्या वडुले, राळेगण थेरपाळ तसेच पंधरा ते वीस गावांना वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत. याबाबत यातील काही गावांना नामदार विखे पाटील यांनी भेटी देत परस्थीतीची माहिती करुण घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना सुचना दिल्या. यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीमालाला भाव नाही त्यातच यावर्षी पाउसाचे प्रमाण अत्यल्प आहे. शेतकरी पुर्णपणे हतबल झाला आहे त्यातच रविवारी झालेल्या गारपीट,वादळी वारा तसेच पाउस कांदा उत्पादक शेतकरी, फळबागायतदार तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून सरकारने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी एक ते सव्वा लाख रुपये नुकसानभरपाई दिली तरच शेतकरी समर्थपणे उभा राहील तसेच बॅंका,सोसायटी पतसंस्था यांच्या वसुली थांबवावी अशी मागणी केली.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, परस्थीती अत्यंत गंभीर आहे याची सरकारला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून पंचनामा करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी नामदार विखे पाटील यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...