spot_img
देशकाँग्रेसला दिलासा! 'ती' कारवाई लोकसभा निवडणुकीनंतर होणार?

काँग्रेसला दिलासा! ‘ती’ कारवाई लोकसभा निवडणुकीनंतर होणार?

spot_img

Congress News : लोकसभा निवडणुकीआधीच आयकर विभागाने काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. आयकर विभागने ३५०० कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस दिली होती. या दरम्यान, आता काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस विरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने सोमवारी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलण्यात यावी आणि निवडणुकीनंतरच सुनावणी घेण्यात यावी, असे विभागाने न्यायालयाला सांगितले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्हाला कोणत्याही पक्षाचा त्रास वाढवायचा नाही, असंही आयकर विभागाने न्यायालयात म्हटले आहे. यावर आता कोर्टाने पुढील सुनावणी २४ जुलै रोजी घेणार असल्याचे सांगितेले आहे. केंद्र सरकार आयकर विभागाचा वापर करून पक्षाला अस्थिर करू इच्छिते, असा आरोप यापूर्वी काँग्रेसने केला होता.

आयकर विभागाच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली हीत. ‘देशातील लोकशाही संपली आहे. आमची खाती गोठवली गेली आहेत आणि शेकडो कोटींच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. यानंतरही देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग आणि माध्यमे गप्प आहेत. सर्वजण एकत्र शो पाहत आहेत. लोकशाही नष्ट करण्याचा डाव आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...