spot_img
देशरील्स बनवणे पडले चांगलेच महागात!

रील्स बनवणे पडले चांगलेच महागात!

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनेक जण रीलच्या माध्यमातून सुपरहिट झाले असल्याचे अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. परंतु याच रील ने पुन्हा एकदा एकाचा बळी घेतला आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुण पिढी काहीही करायला तयार असते. रील्स तयार करण्यासाठी ते आपला जीव धोयात घालतात.

कधी इमारतीवरून उडी मारून स्टंट, कधी चालत्या बाईकवर स्टंट, तर कधी पाण्यामध्ये स्टंट करून ते रील्स तयार करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण अशापद्धतीने रील्स तयार करणे हे अनेकांच्या जीवावर बेतते. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. रील्स तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणाने आपला जीव गमावला आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणाने रील्स तयार करण्यासाठी तब्बल १५० फूटांवरून खदानीत उडी मारली. या घटनेमध्ये खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. दिनेश मीणा असं या तरुणाचे नाव आहे. उदयपूर शहरातील गोवर्धन विलास पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लाई गावामध्ये हा तरुण राहत होता. हा तरुण आपल्या चार मित्रांसोबत खदानीवर फिरण्यासाठी गेला होता. याठिकाणी तो मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर रील्स शूट करत होता. त्याचवेळी रील शूट करण्यासाठी त्याने खदानीत उडी मारली पण तो परत बाहेर आलाच नाही. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिनेशने रील्स बनवण्यासाठी १५० फुटांवरुन खदानीत उडी मारली. तो पाण्याच्या बाहेर आलाच नाही. त्यामुळे मित्रांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सिव्हिल डिफेन्स पथकाच्या सहाय्याने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...