spot_img
ब्रेकिंगपावसाचा रेड अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना धोका

पावसाचा रेड अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना धोका

spot_img

Rain update: एप्रिल महिना सुरू असूनही राज्यात उन्हाऐवजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत असून, आता हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या दक्षिण भागापासून कर्नाटकपर्यंत सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पावसासोबत 40 ते 45 किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा धोका आहे. गारपीटीची शक्यता लक्षात घेता शेतीचंही मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या भागांमध्ये तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असला, तरी वातावरणात प्रचंड आर्द्रता असल्यामुळे हवामानात प्रचंड अस्थिरता आहे.

त्यामुळे पावसाचे जोरदार झटके येण्याची शक्यता कायम आहे. राज्यात पावसाचा जोर असताना, मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण आहेत. पुढील चार ते पाच दिवस उष्म्याची लाट मुंबईत कायम राहणार असून, मळभ कमी झाल्यानंतर उष्णता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. शहरात किमान तापमानात फारसा बदल झालेला नसला तरी उकाडा आणि घामाच्या तक्रारी वाढल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...