spot_img
देशLok Sabha Election Exit Poll 2024 : भाजपचा नारा खरा ठरणार? काय...

Lok Sabha Election Exit Poll 2024 : भाजपचा नारा खरा ठरणार? काय म्हटले आहे एक्झिट पोलमध्ये…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :

Lok Sabha Election Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजील संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या 400 पार जागांचा दावा तीन एक्झिट पोल खरा ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. चाणक्य, सीएनएक्स आणि न्यूज नेशन या दोन एक्झिट पोलमध्ये भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरताना दिसत आहे, पण या 400 जागा एकट्या भाजपला नाही, तर एनडीएला मिळू शकतात. एक्झिट पोल काय सांगतो…

टुडेज चाणक्य एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 400 पार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. चाणक्य एक्झिट पोलनुसार, भाजपला 335 जागांवर विजय मिळून शकतो, तर एनडीएला 400 जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला 50 जागांवर समाधान मानावं लागेल. इंडिया आघाडीला 107 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना 36 जागा मिळू शकतात.

न्यूज नेशनच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 342-378 जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार, इंडिया अलायन्सला 153-169 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 21-23 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक 401 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. हा एक्झिट पोल भाजपच्या 400 पार जागांच्या घोषणेच्या जवळ जात आहे. यामध्ये एनडीएला 371 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 109 ते 131 तर इतर पक्षांना 28 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 353-368 जागा मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेस आघाडीला 118-133 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 43-48 जागा मिळण्याची शक्यता आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 281-350 जागा मिळतील, तर इंडिया अलायन्सला 145-201 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

भाजप स्वबळावर 400 पार गाठू शकत नाही
कोणत्याही एक्झिट पोलमध्ये भाजपला स्वबळावर 400 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. भाजपने यावेळी ‘400 पार’ असा नारा दिला होता. एक्झिट पोलमध्ये भाजप या घोषणेपासून खूप दूर असल्याचे दिसत आहे. पण, काही एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार घोषणेच्या जवळपास असल्याचं दिसत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...

Ahmednagar Crime: १० तोळ्यांच्या दागिन्यांसह मेकॅनिक रेहान अडकला जाळ्यात; अल्पवयीन मुलीसोबत केलेला प्रकार भोवला?

Ahmednagar Crime: सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून सुमारे...

Ahmednagar News: आमदार ‘आरोपी’ चे ‘बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप नेत्याने थेट अजित पवार गटाच्या आमदारावर निशाणा साधला

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती....