spot_img
अहमदनगरसुप्यासह पारनेरमध्ये राजाश्रीत गुन्हेगारी!; पोलिसांचा वचक संपला...

सुप्यासह पारनेरमध्ये राजाश्रीत गुन्हेगारी!; पोलिसांचा वचक संपला…

spot_img

गुन्हेगारांना पाठबळ देणारी खाकीची मानसिकता
पारनेर | नगर सह्याद्री
सुपा औद्योगिक वसाहतीत एका उद्योजकाला मारहाण करण्यात आली. ही मारहाण कामगारांच्या पळवापळवीतून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मारहाण कशातून झाली याहीपेक्षा ती ज्यापद्धतीने झाली आणि घटनेचा व्हिडीओ पाहता सुपा औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात कायद्याचा धाकच संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुपा औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून ती संपूर्णत: राजाश्रीत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. काही ठिकाणी राजकारण्यांचा तर काही ठिकाणी पोलिसांचा आश्रय गुन्हेगारांना मिळत असल्याने या तालुक्यातील पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना बदल्याची मागणी सामाजिक संघटनांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्फत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यकडे केली आहे.

सुपा औद्योगिक वसाहतीत कामगार पळवापळवीच्या वादातून दिनेश उरमुडे या उद्योजकाला पाच ते सहा जणांनी लाकडी दांडयाने मारहाण केली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याबाबतचा व्हिडीओ पाहता गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचेच स्पष्टपणे समोर आले आहे. या घटनेतील जखमी शुभम इंजिनिअर कंपनीचे मालक उद्योजक दिनेश प्रमोद उरमुडे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेतील गुन्हेगार आरोपी नगर तालुक्यातील भोयरेपठार आणि पिंपळगाव कौडा या गावचे रहिवाशी आहेत.

या आरोपींना पारनेर तालुक्यातील एका मोठ्या नेत्याचे आशिर्वाद आहेत. नेत्याच्याच आशीर्वादाने आणि सहकार्याने यापूर्वीही याच औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योजकांना दिवसाढवळ्या याहीपेक्षा भयंकर अशी मारहाण करण्यात आली. मात्र, पोलिसांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. या प्रकरणात देखील सुपा पोलिस ठाण्यातून कोणतीही ठोस भूमिका घेतली जाणार नाही. कारण, पोलिस अधिकारी हे नेत्यांच्या दावणीला बांधले असल्याची चर्चा आता सुपा गावासह औद्योगिक वसाहतीत जाहीरपणे झडू लागली आहे.

टाकळीं ढोकेश्वर पोलिस स्टेशनसाठी
आ. काशिनाथ दाते लक्ष घालणार का?
तालुक्याचे वाढलेले भौगोलिक क्षेत्र आणि वाढती गुन्हेगारी याचा विचार करता सुपा येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन कार्यन्वीत करण्यात आले. याचवेळी टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूरी दिली. यानंतर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातून त्याचे संपूर्ण सोपस्कर पार पडले. यासाठी आवश्यक असणारी इमारत आणि कर्मचारी निवासस्थानेही तयार करण्यात आली. मात्र, असे असतानाही टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन अद्यापही कार्यन्वीत का करण्यात आले नाही असा प्रश्न आहे. याबाबत आता नव्यानेच आमदार झालेल्या काशिनाथ दाते यांनी लक्ष घालावे आणि हे पोलिस स्टेशन कार्यन्वीत करावे अशी मागणी या परिसरातील गावांमधून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....