spot_img
ब्रेकिंगसरकाचा निर्णय राज ठाकरे यांना मान्य नाही; हिंदी भाषा सक्ती विरोधात 'या'...

सरकाचा निर्णय राज ठाकरे यांना मान्य नाही; हिंदी भाषा सक्ती विरोधात ‘या’ तारखेला मोर्चा

spot_img

शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट निष्फळ। हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा गाजणार
मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील तृतीय भाषा धोरणावरून निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. मात्र, सरकारने घेतलेला निर्णय राज ठाकरे यांना मान्य नाही, हे स्पष्ट झाले असून, या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही, अशी माहिती माध्यमांना मंत्री दादा भुसे यांनी दिली.

हिंदी भाषा सक्तीला राज ठाकरे यांचा ठाम विरोध असून, त्यांनी यासंदर्भात सरकारला काही स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या आहेत. दादा भुसे म्हणाले, राज ठाकरे यांनी इतर विषयांच्या गुणांच्या संरचनेसंदर्भात चांगल्या सूचना केल्या आहेत. त्या आम्ही सकारात्मकपणे विचारात घेणार आहोत. मात्र, हिंदी सक्तीच्या हिंदीच्या विषयावर राज ठाकरेंचा पूर्ण विरोध, असं दादा भुसे यांनी सांगितले. राज्य सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर, साहित्यिक, अभ्यासक आणि विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून ही भेट घेतली गेली. दादा भुसे म्हणाले, राज ठाकरे यांच्याशी झालेली चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सरकार खुल्या मनाने या विषयावर विचार करत आहे. मात्र, चर्चा झाली तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, हे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. मनसेकडून यापूर्वीही मराठीसाठी सातत्याने भूमिका घेण्यात आली आहे. हिंदी भाषा सक्ती हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनातही गाजणार, हे निश्चित झाले आहे.

६ जुलैला गिरगावहून मोर्चा; राज ठाकरे यांची घोषणा
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मराठी माणसासाठी ६ जुलैला गिरगावहून मोर्चा काढण्यात येणार असल्याची मोहिती दिली. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चामध्ये सहभागी व्हा, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले, या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संग्राम जगताप यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका का?, वाचा इनसाईड स्टोरी..

इनसाईड स्टोरी : स्व. अरुणकाकांसह संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम मतपेढी कधी निर्णायक...

मोठी बातमी! शरद पवारांची राज-उद्धव ठाकरेंना साथ, रोखठोक बोलले..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतूनच त्रिभाषा सूत्र राबवण्याच्या निर्णयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यावरून तापणार, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री राज्य विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या...

राज्यात पावसाची रिपरिप वाढणार का?; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान...