spot_img
ब्रेकिंगबाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार (25 ऑगस्ट) सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाहेर पडण्यापूव नागरिकांनी हवामान अपडेट तपासण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले आणि सांताक्रुझ या परिसरात पहाटेपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 10-15 मिनिटांपासून या भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जर असाच पाऊस काही काळ सुरू राहिला, तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू असून, सध्या तिथे पाऊस थांबला आहे. नवी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 26 आणि 27 ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींसह अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल. वाऱ्याचा वेग 25-30 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्राला भरती येण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

शहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटवा; कोणी केली मागणी?

सकल हिंदू समाज बांधवांची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री रस्त्याच्या मधे येणारी धार्मिक...