spot_img
ब्रेकिंगRain Update : पुढचे तीन दिवस धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी...

Rain Update : पुढचे तीन दिवस धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसत आहे. काही जिल्ह्यात तर अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाल्याने नदी-नाले दुधडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने तलाव अर्धे भरले आहेत. तर, मुंबईतही पावसाने जोर धरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं सखल भागांत पाणीदेखील साचले होते. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजला आहे. पंचगंगा, जगबुडी, सावित्री नद्यांनी इशारा पातळी गाठली होती. सोमवारी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. त्याशिवाय राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस होणार आहे. पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे.

समुद्रसपाटीवरील गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टी सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर कायम आहे. त्यामुळे किनारपट्टी, घाट परिसरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रेड अलर्ट – रत्नागिरी, सातारा

ऑरेंज अलर्ट – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे

यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...