spot_img
अहमदनगरराज्यात मुसळधार पावसाचा इशारा; चार ते पाच दिवस अहिल्यानगरमध्ये...

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; चार ते पाच दिवस अहिल्यानगरमध्ये…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची हजेरी अधूनमधून लागलेली असतानाच, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर जाणवणार आहे.

आजपासून (7 जून) महाराष्ट्रातील विविध भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच पुणे आणि मुंबईसह काही शहरी आणि ग्रामीण भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यात पावसाचा जोर जाणवतोय.

पावसाचा परतीचा जोर वाढणार
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, नैऋत्य मोसमी पाऊस आता महाराष्ट्रात सक्रिय असून उत्तरेकडील जिल्ह्यांकडे त्याचा प्रवास सुरू आहे. राजस्थानजवळ चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय झाल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या बारामती, इंदापूर, दौंड या भागांत तसेच मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने पुढील जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे:पश्चिम महाराष्ट्र व कोकण पुणे, रायगड, नाशिक, ठाणे, पालघर, रत्नागिरी विदर्भ व मराठवाडा जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जालना

१३ ते १८ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, १३ जून ते १८ जून या कालावधीत महाराष्ट्रात सर्वदूर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकणपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नाले, ओढे वाहण्याइतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सावधगिरी बाळगा
राज्याच्या विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे, गरज नसताना घराबाहेर न पडणे, तसेच नदीकाठ, डोंगराळ किंवा कमी उंचीच्या भागात राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईकरांनो पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून रेडअलर्ट जारी
गेल्या तासाभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतील लोअर परळ, दादर, वरळी, चर्चगेट, सायन, कुर्ला, घाटकोपर, पवई आणि भांडूप या भागांमध्ये पावसाचा जास्त जोर पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून पुढील ३ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील ३ तासांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

गरज असल्यासच घराबाहेर पडावे
मुंबईत होणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचू शकते. चर्चगेट, परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा आणि फोर्ट यांसारख्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल, अस अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. कोणतीही अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. पण त्यानंतर काही दिवसांनी पाऊस कमी झाला. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज ७ जून २०२५ रोजी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडत आहे.

नवी मुंबई आणि रायगडसाठी इशारा
मुंबईसोबतच नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत या भागांमध्येही पावसाचा जोर वाढेल आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, बेलापूर या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे.

कल्याण-डोंबिवलीत पाऊस
कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची सुरू होती. मात्र आज सकाळीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. काही तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पुन्हा तासभर जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे या तासाभराच्या पावसाने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्याची मात्र चांगलीच पोल-खोल केली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील एच वर्ड शेजारील रस्त्यावर जवळपास गुडघ्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. मात्र केडीएमसीकडून या रस्त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...