spot_img
अहमदनगरमहाराष्ट्रात पावसाचा कहर! अहिल्यानगर जिल्ह्याला रेड अलर्ट, शक्य असल्यास घरातच थांबा

महाराष्ट्रात पावसाचा कहर! अहिल्यानगर जिल्ह्याला रेड अलर्ट, शक्य असल्यास घरातच थांबा

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोर पकडला असून, हवामान विभागाने राज्यातील तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात वाऱ्यांची दिशा बदलून पावसाला अनुकूल हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

रेड अलर्ट असलेले प्रमुख जिल्हे
शनिवार, २७ सप्टेंबर: नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे, धाराशिव, बीड, अहिल्यानगर

रविवार, २८ सप्टेंबर: सोलापूर, पुणे, सातारा, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर

लातूर जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी
लातूर जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर सर्व शाळांना आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह ठरत असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, रात्रीपासून लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी जलसाठ्यांमध्ये वाढ होत असून, प्रशासनाकडून नदीपात्र आणि धरणांजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सावधगिरी हाच उपाय
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी शक्य असल्यास घरातच राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता
अहिल्यानगर– भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,९४० क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ९,४६५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून ८२० क्यूसेक, निळवंडे धरणातून १,५२१क्यूसेक,ओझर बंधारा १,८८२ क्युसेक, मुळा धरणातून २,००० क्युसेक, घोड धरणातून ५,००० क्युसेक, सीना धरणातून ३,०७० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ६०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ५५० क्युसेक, खैरी धरण येथून १३,२४३इतका विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सूचना
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या  केबल्स् पासून दूर रहावे.
जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी,
विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.
नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला, वाचा क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव परिसरात घरासमोर पार्क केलेली टाटा हॅरियर गाडी रात्रीच्या...

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले...

नगरकरांनो सतर्क राहा! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025...

मर्चंट्‌‍स बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदांनासाठी खुशखबर, बँक काय देणार भेट?, वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्‌‍स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा...