spot_img
देशपरभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

spot_img

परभणी / नगर सह्याद्री –
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी पोलीस जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तर पोलिसांनीच त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय.

सोमनाथ सूर्यवंशी याला मारले आणि त्याची हत्या केली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसची विचारधारा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना सूर्यवंशी कुटुंबिय भावूक झाले होते.

परभणी प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले आहेत. परभणीमधील घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. या ठिकाणी कोणतेही राजकारण होत नाही. आरएसएसची विचारधारा संविधानविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर शिंदे सेनेची टीका
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केलाय. राहुल गांधी राजकारण करण्यासाठी आले आहे. कोण गेलं? कोण राहिले? याच्यापेक्षा त्यांना घटनेचे पुस्तक घेऊन फिरायचं आहे. घटनेचे पुस्तक घेऊन त्यांना दाखवायचे आहे, की आम्ही घटना मानणारे आहोत, असे संजय शिरसाट म्हणाले.

राहुल गांधी ड्रामेबाजी करत आहेत, त्यांना लोकांच्या समस्येचं देणंघेणं नाही. त्यांना त्या कुटुंबियांचं देणंघेणं नाही , त्यांच्या पक्षाला मिळालेला विषय तेच घेऊन चघळत बसतात. आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत, हे दाखवण्याचा ती प्रयत्न करतात, त्यांच्या नौटंकीला लोक जुमानणार नाहीत, असं हल्लाबोल संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...