spot_img
देशमोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचे मोठे वक्तव्य; अयोध्येत पराभव झाला, तसाच...

मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचे मोठे वक्तव्य; अयोध्येत पराभव झाला, तसाच…

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला तसाच गुजरातमध्येही होणार आहे. पंतप्रधान मोदींना वाराणसीत निसटता विजय मिळाला, केवळ एक लाख मतांनी ते विजयी झाले. तर अयोध्येतून निवडणूक लढले असते तर दारून पराभवाला सामोरं जावं लागलं असंत. जसा अयोध्येत भाजपचा पराभव झाला, तसाच पराभव गुजरातमध्येही होणार आहे, असं भाकीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. गुजरामधील या विजयानंतर काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमध्ये त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही खूप त्रास सहन केला आहे, खूप लाठीचार्ज सहन केला आहे,. मी स्वत:, प्रियंका गांधी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय काँग्रेसची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. सर्वजण मिळून यांना सरकारमधून खाली खेचायचं आहे.

त्यांनी आमच्या कार्यालयावर हल्ला केला, मात्र घाबरण्याची गरज नाही. यातून त्यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे, हे आव्हान स्वीकारून गुजरातमध्ये भाजपचा पराभव करायचा आहे. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करणार आहे. संसदेत मी अयोध्येतील खासदाराला विचारले की, भाजपने निवडणुकीपूर्वी राम मंदिराची स्पापना केली.. पण अयोध्येत इंडिया आघाडीने निवडणूक जिंकली, हे कसं शक्य झालं?

भाजपचे संपूर्ण लक्ष राम मंदिर होतं. त्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेची सुरुवात केली होती. त्या रथयात्रेत नरेंद्र मोदींनी अडवाणींना मदत केली होती, असं सांगितलं जातं. मी संसदेत विचार करत होतो की त्यांनी राम मंदिराचं उद्घाटन केले आणि उद्घाटनाला अदानी-अंबानी यांना निमंत्रण दिलं. मात्र गरीब जनता दिसली नाही. अयोध्या विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, मात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अयोध्येतील कोणीही सहभागी झालं नव्हतं. कारण भाजपला अयोध्येतून राजकारण करायचं होतं. भाजपने प्रभू रामाच्या नावावर राजकारण केलं, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बळीराजासाठी महत्वाची बातमी! अनुदान मिळण्यासाठी ‘ती’ नोंदणी केली का?, सरकारने घेतला ‘मोठा’ निर्णय..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- कापूस आणि सोयाबीन पिकांच्या अर्थसहाय्याच्या लाभासाठी आता ई-पीक पाहणी पोर्टलवर...

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार! ‘या’ दिवशी होणार लाँच

नगर सहयाद्री वेब टीम:- मारुती सुझुकीची गाडी भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे, आणि आता कंपनीने...

मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा! कुठे करणार आयोजन? वाचा सविस्तर..

Manoj Jarange Patil: दरवर्षी शिवसेनेचा, आरएसएसचा आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा...

ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? ‘ते’ नियम तुम्हाला माहित आहे का? ‘या’ 5 गोष्टींचा करावा लागतो सराव..

नगर सहयाद्री वेब टीम:- आजकाल ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड हे कागदपत्र...