spot_img
अहमदनगरविजयाच्या उंबरठ्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; सुजयने माझ्यासाठी..

विजयाच्या उंबरठ्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; सुजयने माझ्यासाठी..

spot_img

राहता । नगर सहयाद्री:-
माझा विजय मतदारसंघातील जनतेला समर्पित आहेत. सुजयने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. खरंतर महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना फटका बसताना दिसत आहे.

महायुतीने थेट विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. राज्याच्या निवडणुकीचे मतमोजणीत महायुतीचे २१७ उमेदवार आघाडीवर आहेत. महायुतीच्या अनेक उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. शिर्डीतही भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. विखे पाटील बाराव्या फेरी अखेर ३४,७९९ मतांनी आघाडीवर आहेत.

तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर जाताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी हस्तांदोलन करत गळाभेट घेतली.

दरम्यान, नगरमध्येही महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नगर शहर मतदारसंघात महायुतीचे संग्राम जगताप आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातही बाराव्या फेरीनंतर महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर आहेत.

तर बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काशिनात दाते आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत दाते यांना ४७२५ मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या राणी लंके पिछाडीवर आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...