spot_img
ब्रेकिंगविधानसभेत राडा! शिंदे गटाचे 'ते' दोन आमदार ऐकमेंकाना भिडले, नेमकं कारण काय?...

विधानसभेत राडा! शिंदे गटाचे ‘ते’ दोन आमदार ऐकमेंकाना भिडले, नेमकं कारण काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री
विधीमंडळाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असतनाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाला. विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचे बोलले जाते.

या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी विधानभवनात येऊ नये अशी प्रथा आहे. सत्ताधारी मंत्री आमदारांमध्ये हमरीतुमरी होणे धक्कादायक आहे. संस्कृती धुळीस मिळवली आहे. महेंद्र थोरवे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. विधानसभेत असं होऊ नये असं प्रामाणिक मत आहे. विधानसभेचे नावलौकीक कायम राहू द्या असं राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तर महाराष्ट्रात भाजपानं जे राजकारण उभं केले, त्यात सभागृहालाच आखाडा केलेला दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांवर लॉबीत भिडले गेलेत. हे खोयाचे प्रकरण आहे. हा प्रकार लाजिरवाणा आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, दादा भुसे यांच्याशी बोललो, समज गैरसमज असतात. मतदारसंघातील काम विचारायला गेले तेव्हा चर्चा होत असते. दादा भुसे हे मंत्री आहेत. ते दिघेंपासून एकनिष्ठ आहेत. आमदार ही व्यक्तीच असते. सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनांशी गोळीबाराशी तुलना करणे योग्य नाही. धक्काबुक्की झाली नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करून द्या यासाठी आमदार आग्रही होते. ज्यावेळी असे प्रकार घडले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे असं आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...