spot_img
महाराष्ट्र'एक ना धड पण बारा भानगडी' खासदार विखे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार

‘एक ना धड पण बारा भानगडी’ खासदार विखे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार

spot_img

राहुरी। नगर सहयाद्री
देशात सध्या मोदीजींची हमी सुरू असून देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

राहूरी तालूक्यातील सोनगाव चौकात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ. विखे म्हणाले, विरोधकांकडे नेता म्हणून कोणताही चेहरा नाही. त्यांच्याकडे ‘एक ना धड बारा भानगडी आहेत’. ते फक्त देशाला खड्ड्यातच घालू शकतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र हे देशाला एकमेव पर्याय आहेत. सदरची निवडणूक ही देशाची प्रतिनिधित्व ठरवणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात देश कुणाच्या हाती द्यायचा आहे हे जनतेला ठरवायचे आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके प्रभावी नेतृत्व नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मागील १० वर्षात जी प्रगती केली हे जगासमोर मोठे उदारण आहे. देशात संविधान मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

लोकशाही अधिक सुदृढ आणि लोखाभिमुख करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा आणि महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सूर्य आग ओकतोय! राज्यात उष्णतेची तीव्र लाट; विदर्भाला येलो अलर्ट, पारा 44 अंश पार

मुंबई | नगर सह्याद्री अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा कडाक्याचं ऊन पडायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात...

घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू!; राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - मंगळवार {8 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात...

मालमत्ताधारकांसाठी महत्वाची बातमी; महानगरपालिका करणार ‘ती’ कारवाई

आयुक्त यशवंत डांगे | नवीन वर्षातील करवसुलीला सुरुवात | 10 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा अहिल्यानगर...

महापालिकेची ‘ती’ कारवाई अन्यायकारक; योगीराज गाडे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेची कारवाई अन्यायकारक असून कायद्यानुसार मोजमाप होईपर्यंत कुठलीही तोडफोड करण्यात येऊ...