spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ; नगराध्यक्षपदासाठी जोरदार लढती! 'या' पक्षाचा ‌‘स्वबळाचा नारा‌’

अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ; नगराध्यक्षपदासाठी जोरदार लढती! ‘या’ पक्षाचा ‌‘स्वबळाचा नारा‌’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:
श्रीगोंदा तालुक्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष व गटांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा नारा देत श्रीगोंद्यात तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते, विद्यमान आमदार विक्रमसिंग पाचपुते यांना टक्कर देण्यासाठी अनेक विरोधकही आता अजितदादांच्या छत्राखाली आले आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र दिसत आहे.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार तसेच भगवानराव पाचपुते हे नेते सांभाळणार आहेत. स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. श्रीगोंदा शहराची जबाबदारी घनश्याम शेलार यांच्याकडे देण्यात आली असून मांडवगण, कोळगाव आणि येळपणे या जिल्हा परिषद गटांची जबाबदारी माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे देण्यात आली आहे.

तर आढळगाव, बेलवंडी आणि काष्टी या गटांची धुरा राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नहाटा यांच्या हाती देण्यात आली आहे. या नव्या राजकीय रचनेमुळे तालुक्यातील इतर गटांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नगराध्यक्षपद एकच, दावेदार मात्र अनेक! अशी परिस्थिती निर्माण झाली असून या पदासाठी अनेक दिग्गज नेते, नवीन चेहरे आणि तरुण कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

शहरातील विविध प्रभागांमध्ये बैठका, जनसंपर्क मोहिमा आणि विकासाच्या आश्वासनांची मालिका सुरू झाली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, घनकचरा, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर मतदारांचे लक्ष केंद्रीत असून नागरिकांना पारदर्शक व विकासाभिमुख नेतृत्व अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत बैठकांनंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असून सध्या तरी श्रीगोंद्यातील राजकारणात एकच पद – दावेदार अनेक!‌’ अशीच स्थिती आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील ही निवडणूक रंगतदार आणि अत्यंत रोचक होणार, असे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...